
मध्ययुगात किंबहुना ५०-६० वर्षांपूर्वी सुद्धा स्वसंरक्षण म्हणजेच सेल्फ डिफेन्स हे जीवनावश्यक कौशल्य होते. ते नसेल तर कुणाचेही बाराच्या भावात मरण होत असे. आज काळ बदलला आहे.
जीवनावश्यक म्हणून कौशल्यांची यादी करायची झालीच तर, आर्थिक नियोजन हे कौशल्य यादीत फार वरती यायला हवे. आपल्या पैशांना वाचवायला, वाढवायला आणि त्यांचे रक्षण करायला शिकणे फार महत्त्वाचे आहे.
आधी तलवार आणि परशू घेऊन डाकू तुम्हाला लुटायचे आज पांढऱ्या कॉलरचे कपडे घालून आणि टाय लावलेले व्हाईट कॉलर डाकू तुम्हाला लुटताहेत. पूर्वीचे गुलाम साखळदंडात बांधलेले असायचे आजचे गुलाम क्रेडिट कार्डात, कर्जाच्या हफ्त्यात आणि टिविवर-सिनेमांत दाखवलेल्या आभासी चमकत्या जगाचे प्रलोभन दाखवून बांधून ठेवलेत.
३१ तारखेला टॉप अप झालेले बँक अकाउंट पुढच्या महिन्याच्या ३१ तारखेपर्यंत रिकामे होत असेल तर आर्थिक नियोजन नावाचे जीवनावश्यक कौशल्य शिकून घ्यायची तुम्हाला गरज आहे.
उत्पन्न अमर्याद नाही.
खर्च सरणावर जाईपर्यंत आहे.
Discover more from Vittartha
Subscribe to get the latest posts sent to your email.